सोमवार, १९ मार्च, २०१२

उगाचच...

विरहाचे दुःख
बाजूला सारत
लागलो परत
जगायला

हसरा भासतो
बाहेर जगाला
आनंद मनाला
क्वचितच

एकदा परत
मऊ मखमली
पदराची सावली
मिळेल का?

नेली हिरावून
जीवनाची गती
शोकांत ही किती
करायचे

आठवता तिला
लवते पापणी  
डोळ्यातून पाणी
टचकन

सांगतो रुपेश
प्रेम नका करू
जितेपणी मरू
उगाचच...


- रुपेश तेलंग
१६ - ३ - २०१२
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फक्त व्हावी

 तुझ्या स्पर्शाला गुंतलेलं मन असं भारक्त व्हावी। तुझ्या कुशीशी विसावणारी ओळख चिरंतक्त व्हावी॥ खुब मालुम आहे तुझ्या नजरेला साद घालणं। तरी ती ...