एकदा भेट झाली की
ओळखीचा रंग फुलतो
उलगडत जाणारं नातं
सोबतीचा अर्थ बनतो
आयुष्याची उर्वरीत पाने
आपोआप जोडली जातात
फुलणार्या नवीन नात्याला
निरभ्र करून जातात
वाटेला आलेल्या रंगांचा
अनाहत बेरंग होतो
सूर गवसण्याआधीच
आवाज पोरका होतो
- कल्याणी
आयुष्य जगताना चांगल वाईट बघताना आपल्या भावनांना शब्दात व्यक्त करताना तयार झालेल्या माझ्या कवितांचा संग्रह
गुलाबी साडीतली ती कोमल छटा, खांद्यावर रुळत्या त्या रेशमी बटा हसण्यात तिच्या मधुर सुरांचे गंध, आनंद सर्वत्र ती विखुरते मंद मंद गालांतले हसू...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा