बुधवार, १९ मार्च, २०१४

सूर

एकदा भेट झाली की
ओळखीचा रंग फुलतो
उलगडत जाणारं नातं
सोबतीचा अर्थ बनतो

आयुष्याची उर्वरीत पाने
आपोआप जोडली जातात
फुलणार्या नवीन नात्याला
निरभ्र करून जातात

वाटेला आलेल्या रंगांचा
अनाहत बेरंग होतो
सूर गवसण्याआधीच
आवाज पोरका होतो

- कल्याणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

फक्त व्हावी

 तुझ्या स्पर्शाला गुंतलेलं मन असं भारक्त व्हावी। तुझ्या कुशीशी विसावणारी ओळख चिरंतक्त व्हावी॥ खुब मालुम आहे तुझ्या नजरेला साद घालणं। तरी ती ...