बुधवार, १९ मार्च, २०१४

सूर

एकदा भेट झाली की
ओळखीचा रंग फुलतो
उलगडत जाणारं नातं
सोबतीचा अर्थ बनतो

आयुष्याची उर्वरीत पाने
आपोआप जोडली जातात
फुलणार्या नवीन नात्याला
निरभ्र करून जातात

वाटेला आलेल्या रंगांचा
अनाहत बेरंग होतो
सूर गवसण्याआधीच
आवाज पोरका होतो

- कल्याणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी अन् तु

मी खवळलेला समुद्र, तू शांत किनारा तु नीटनेटकं घर मी अस्ताव्यस्त पसारा.  तु लयबद्ध पद्य मी रटाळ कथा तु मनजोगी ईच्छा मी नाहक व्यथा तु जुळलेला ...