बुधवार, १९ मार्च, २०१४

सूर

एकदा भेट झाली की
ओळखीचा रंग फुलतो
उलगडत जाणारं नातं
सोबतीचा अर्थ बनतो

आयुष्याची उर्वरीत पाने
आपोआप जोडली जातात
फुलणार्या नवीन नात्याला
निरभ्र करून जातात

वाटेला आलेल्या रंगांचा
अनाहत बेरंग होतो
सूर गवसण्याआधीच
आवाज पोरका होतो

- कल्याणी

सोमवार, १७ मार्च, २०१४

होळी निमित्ताने

होळी निमित्ताने
कवितेत दंग
मनातील व्यंग
शोधूया का

मग्न मीच आज
कोण्या विचारात
आवेश ओघात
कसल्याशा

माझेच मलाही
कळेनासे झाले
कोठे हे निघाले
मन माझे

मनात काहूर
माजलेले आहे
सर्वदुर पाहे
प्रतिबिंब

रोजची सवड
लाभेल कुणाला
आजच क्षणाला
जगूद्याकी

काय कोण जाणे
कधी का भेटले
निरस कुठले
तुम्ही सर्व

रुपेशचे काम
चारोळ्या करणे
आपण करावे
वाचायचे

कविता कराया
नाही कचरत
जातो मी रचत
शब्द शब्द

सुचावे विचार
असे नवे जुने
परी न मागणे
देवाकडे

- रुपेश तेलंग
१६-०३-२०१४

गुरुवार, १३ मार्च, २०१४

का हिरावले

दुःख अनावर झाल्यागत
नभ धाय मोकळून रडत आहे
काय हिरावले त्याचे कुणी
का असा तडफडत आहे

सुखाची स्वप्ने सुद्धा
आता याला बघवत नाही
ग्रासल्या तमेने आता
काजवे ही विझत आहे

का हरवला कवडसा
शेजारच्या पणतीतला
अश्रु रंजित नजर ही
का रोखली शुन्यात आहे

- रुपेश तेलंग
२-३-२०१४

मी अन् तु

मी खवळलेला समुद्र, तू शांत किनारा तु नीटनेटकं घर मी अस्ताव्यस्त पसारा.  तु लयबद्ध पद्य मी रटाळ कथा तु मनजोगी ईच्छा मी नाहक व्यथा तु जुळलेला ...