सोमवार, १९ मार्च, २०१२

उगाचच...

विरहाचे दुःख
बाजूला सारत
लागलो परत
जगायला

हसरा भासतो
बाहेर जगाला
आनंद मनाला
क्वचितच

एकदा परत
मऊ मखमली
पदराची सावली
मिळेल का?

नेली हिरावून
जीवनाची गती
शोकांत ही किती
करायचे

आठवता तिला
लवते पापणी  
डोळ्यातून पाणी
टचकन

सांगतो रुपेश
प्रेम नका करू
जितेपणी मरू
उगाचच...


- रुपेश तेलंग
१६ - ३ - २०१२
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी अन् तु

मी खवळलेला समुद्र, तू शांत किनारा तु नीटनेटकं घर मी अस्ताव्यस्त पसारा.  तु लयबद्ध पद्य मी रटाळ कथा तु मनजोगी ईच्छा मी नाहक व्यथा तु जुळलेला ...