बुधवार, २४ सप्टेंबर, २०१४

नको जाऊ सोडून...

अताशा कुठे पास आलीस माझ्या
नको जाऊ सोडून तान्ह्या जीवाला ।
बहाणी पुरे, कारणे ही पुरे ती
सहवास तुझा हा हवा जगण्याला ॥

बोलणे तुझे ते लळा लावीसी ग
शब्दांनी तुझ्या गुंफिली स्वरमाला ।
तुझे आसणे ही जणु मेजवानी
तुझ्या नसण्याने जणु रिक्त प्याला ॥

श्रृंखला तुटोनी माणिके गळावी
तुझ्या आसवांची ना किंमत तुला ।
खळीने त्या रोज प्राजक्त फुलतो
का कारणं नसे तुझ्या हसण्याला ॥

- रुपेश तेलंग
२४-०९-२०१४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी अन् तु

मी खवळलेला समुद्र, तू शांत किनारा तु नीटनेटकं घर मी अस्ताव्यस्त पसारा.  तु लयबद्ध पद्य मी रटाळ कथा तु मनजोगी ईच्छा मी नाहक व्यथा तु जुळलेला ...